जिल्हा परिषदेचे शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर राहणार आहे.
एटीएम कार्डची अदलाबदल करून वयोवृद्धांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास सातारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याला पुढील कारवाई करता पुणे शहर मधील उत्तम नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आज सकाळी भुईंज गावच्या हद्दीत मुंबईकडे निघालेल्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालकाने प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.
शासनाच्या क्रीडा संचालनालयाकडून, सातारा शहरातील छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये सिंन्थेटिक ट्रॅक करीता आणि क्रीडा साहित्यासह इतर बाबींसाठी रुपये 15 कोटी रुपयांच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
सातारा जिल्हयातील जावळी तालुक्यामध्ये अवैद्य मद्य विक्री बाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असून सबर ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या विविध पथकांनी वेळोवेळी अवैद्य मद्य वाहतुक विक्रीवर कारवाई करुन महाराष्ट्र दारुबंदी अधीनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल करुन सराईत गुन्हेगारांविरुद्ध याच अधीनियमाचे कलम ९३ अन्वये चांगल्या वर्तवणुकीचे बंधपत्र घेण्याबाबत मा. उप विभागीय अधीकारी यांचेकडे वेळोवेळी प्रस्ताव सादर केलेले आहेत.
बहीण-भावाच्या नात्याची विण अधिक घट्ट कारणार्या रक्षाबंधनसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध असून छत्रपतींची राजमुद्रा, रुद्राक्ष अक्रॅलिक, नाजूक कलाकारी व रेशमी धाग्यांच्या राख्या लक्षवेधी ठरत आहेत.
धर्मादाय रुग्णालयांमध्ये त्यांच्या एकूण कार्यान्वीत खाटांपैकी 10 टक्के निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व 10 टक्के खटा दुर्बल घटकांतील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम घाट भाग आणि प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे तारळी धरणातून ही २ हजार क्युसेक विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (कडठझ) बसवणे बंधनकारक असताना, नेमलेल्या एजन्सींकडून प्लास्टिक ब्रॅकेटच्या नावाखाली वाहनधारकांची उघडपणे आर्थिक लूट सुरू आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये लवकरच आठ मंत्र्यांच्या पदांवर गंडांतर येणार आहे, असे भाकीत खासदार संजय राऊत यांनी वर्तवले होते. या वक्तव्याचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातार्यात खोचक समाचार घेतला.