सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कृष्णा नदीच्या पुलावरून एका तरुणीने नदीत उडी मारली. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय 26) असं या तरुणीचं नाव आहे.
भारतात दरवर्षीत अडीच लाख मृत्यू कावीळीमुळे होतात म्हणजे तिस सेकंदात एक मृत्यू होत आहे. कावीळ हा गंभीर आजार असून प्रत्येक व्यक्तीने कावीळीची तपासणी करून घेणे व लसीकरण करुन घेणे गरजेचे असून कावीळीचा संसर्ग रोखण्याकरीता समाजाचा सहभागही महत्वाचा आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये दरोडा, चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडी असे तब्बल 23 गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा परिसरात उपाययोजना करण्याबाबत सातारा शहरातील विविध शाळांमधील मान्यवरांनी आज पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण अनेकदा आपल्या शरीरातील लहान बदलांकडे दुर्लक्ष करतो, जे नंतर मोठ्या आजारांचे लक्षण बनू शकतात. अगदी हाता पायांची नखे वाढणे, शरीरावर केस असणे किंवा नसणे ही बाब आपल्याला अतिसामान्य वाटते.
भारतातील सर्व ठिकाणी राखी पाकिटांचे वितरण लवकरात लवकर होण्यासाठी सातारा टपाल विभागातर्फे राखी पाकिटे स्वीकारण्यासाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै जकातवाडी, ता. जि. सातारा येथे नालसा, मालसा योजना, एडीआर पध्दती आणि त्याचे फायदे, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये या विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गायीचे दुधाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्या दुधाचे अनुदान शासनाने बंद केले आहे. अनुदान सुरू असताना ३५ रुपये प्रतिलिटर असलेला दुधाचा दर आता ३१ रुपयांवर घसरला आहे.
सातारा जिल्ह्यात सुमारे 257 जनावरांना लंपीची बाधा झाली असून, 31 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर बाधित जनावरांवर पशुसंवर्धन विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.
जनता सहकारी बँकेने प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत चांगले यश मिळवले आहे. बँकेच्या इतिहासात प्रथमच शून्य टक्के एनपीए राखण्यात यश मिळवले आहे.