जिल्ह्याच्या पश्चिम घाट भाग आणि प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे तारळी धरणातून ही २ हजार क्युसेक विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (कडठझ) बसवणे बंधनकारक असताना, नेमलेल्या एजन्सींकडून प्लास्टिक ब्रॅकेटच्या नावाखाली वाहनधारकांची उघडपणे आर्थिक लूट सुरू आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये लवकरच आठ मंत्र्यांच्या पदांवर गंडांतर येणार आहे, असे भाकीत खासदार संजय राऊत यांनी वर्तवले होते. या वक्तव्याचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातार्यात खोचक समाचार घेतला.
साताऱ्यात एका शाळकरी मुलीला एकतर्फी प्रेमातून गळ्याला चाकू लावून एका युवकाने धमकावण्याचा प्रकार घडला होता. या घटनेत प्रसंगावधान राखून अमोल इंगवले, उमेश अडागळे यांनी त्या युवकाला अडवून त्या मुलीची सुटका केली आणि तिचे प्राण वाचवले.
कुसगाव (ता. वाई) येथील क्रशर व खाणपट्टा तूर्त बंद ठेवून जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
राज्याचे कृषिमंत्रीमाणिकराव कोकाटे हे सतत वादग्रस्त ठरत असल्याने पक्ष, तसेच महायुतीची प्रतिमा मलिन होत चालली आहे.
दिव्यांग बांधवांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवारी सातार्यात येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आला.
एकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस कराड सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास एक महिन्याची कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सातारा व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांचे संयुक्त विद्यमाने दि. 22 जूलै रोजी पंचायत समिती, सातारा येथे मिशन वात्सल्य अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून आता मुंबई वेधशाळेने २४ आणि २५ जुलै रोजी रेड अलर्ट दिला आहे. यामुळे पश्चिम भागातील घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.