राजवाडा परिसरातील जुन्या जनावरांच्या दवाखान्याच्या जागेमध्ये राजवाडा परिसरातील पार्किंगचा प्रश्न सोडवणारा बहुमजली पार्किंग प्रकल्प तसेच अद्ययावत स्वरूपाची खाऊ गल्ली, बोट टेरेसवर कॅफेटेरिया असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा राहणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला देश पातळीवरील साखर उद्योगाशी सलग्न असलेल्या भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेचा सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना (बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स शुगर मिल) हा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा सुरेखा कोसमकर यांचे मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व संग्राम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ जुलै रोजी वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा येथील सभागृहात बुध्ददेव कर्मरकर वि. पश्चिम बंगाल राज्य या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार लैंगिक कामाच्या कायदेशीरतेसह त्यांचे हक्क, पोलीसांचे अधिकार आणि कर्तव्य तसेच कायद्यानुसार काय परवानगी आहे.
निसर्ग व पर्यावरण रक्षणासाठी तसेच आपले सातारा शहर निसर्गसंपन्न व हरित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. केवळ झाडे लावून चालणार नाही तर, लावलेली झाडे जगवणे त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे.
राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. २२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सातारा व मेढा येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था, संविधानातील तत्त्वांना हरताळ फासत येऊ घातलेले जनसुरक्षा विधेयक, हिंदी भाषेची सक्ती आदी बाबत साताऱ्यातील सर्व पुरोगामी संघटना आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी तीव्र संताप व्यक्त करीत राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार केला.
सातारा शहरातील बसाप्पा पेठ येथे सोमवारी दुपारी 4 वाजता थरारक घटना घडली. अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याला धारदार चाकू लावत खळबळ उडवून दिली.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (ता. 22 ) रोजी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात काम करणार्या ठेकेदारांची राज्यस्तरीय संघटना अस्तित्वात आली असून त्याची घोषणा सातार्यात करण्यात आली. या संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून इंजिनिअर मिलिंद भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. राज्य शासनाकडे प्रलंबित असणार्या 12000 कोटीच्या देयकांसाठी राज्य शासनाला निर्वाणीचा इशारा या बैठकीत देण्यात आला आहे.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत, जनतेसह वाहनचालक आणि प्रवाशांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवल्या पाहिजेत, अशा सूचना बांधकाम विभागाला करण्यात आल्या आहेत.