सातारा-रहिमतपूर मार्गे वडूजकडे येणार्या एसटी बसचा नायकाचीवाडी फाट्याजवळ अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची चर्चा आहे.
महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमारे ठेवण्याकरीता 1 ऑगस्ट महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात येत्या 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. या गणरायाच्या आगमन सोहळ्यासाठी सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांना वीज वितरण, नगरपालिका, धर्मादाय आयुक्त तसेच इतर सर्व परवानग्या एक खिडकी योजने अंतर्गत मिळाव्यात.
सातारा जिल्ह्यातील सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व देणगीदार यांनी धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करावयाची असल्यास मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 (क) नुसार सहाय्यक धार्मादाय आयुक्त, सातारा यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे.
राज्य गुणवंत कामगार असोशिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्यावतीने कोल्हापूर येथे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील ख्यातनाम पत्रकार अमर बाळासाहेब मोकाशी यांना राज्यस्तरीय 'विश्वकर्मा आदर्श पत्रकार' पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
दोन दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये येत असलेल्या जमगीन येथील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ओढ्यातून प्रवास करावा लागतो अशा आशयाच्या बातमी बाबत सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी वस्तुस्थिती समोर आणली आहे.
सातारा पोलिस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील तसेच ऑल इंडिया ड्युटी मेट स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारतात पहिला क्रमांक येण्याचा बहुमान मिळालेला सूर्या या श्वानाचा (डॉग) मंगळवारी हृदयविकाराने मृत्यू झाला.
राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांच्या नेतृत्वात कराड नगरपालिकेच्या वाढीव भागातील बर्गे मळा या ठिकाणी सुविधा नसलेबाबत मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत 3 लाख 98 हजार 603 बाधित शेतकर्यांच्या 1 लाख 87 हजार 53.21 हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने 337 कोटी 41 लाख 53 हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे.
पाणीपुरवठा योजनेच्या केलेल्या कामाचे थकीत बिल सरकारकडून वेळेत न मिळाल्याने हर्षल पाटील या युवकाने टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे जीवन संपवल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे