जिल्ह्यात नववर्ष सुरू झाल्यानंतर किमान तापमानात उतार आला असून, महाबळेश्वरला १३.८ तर सातारा येथे १४.८ अंशांची नोंद झाली. तर चार दिवसांत साताऱ्याचे किमान तापमान चार अंशांनी घसरले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करताना जी ऐतिहासिक वाघनखे वापरली होती ती वाघनखे लंडनहून भारतात आणल्यानंतर गतवर्षातील १९ जुलैपासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली आहेत.
डी-मार्ट परिसरात एकाचा मृतदेह आढळला असल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा.
पत्नी जास्त बोलत असल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. विंग, ता. कराड येथील विंग हॉटेल भागात नवीन वर्षाच्या मध्यरात्री ही घटना घडली.
कास धरणापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फळणी, ता. जावळी गावच्या हद्दीतील झाडीत एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सडक योजनेच्या कामांमध्ये सुधारणा करण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्रिमंडळाच्या सचिव-अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
येथील मंगळवार पेठेतील अक्षय अशोक नलावडे (वय २६ वर्षे ) या युवकाच्या मृत्यूप्रकरणी मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील डॉक्टर भूषण पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शेतकरी ठिबक सिंचनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. केंद्र व राज्य सरकारचे 9 कोटींचे अनुदान थकले आहे.
महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये शैक्षणिक- सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री जानाई मळाई सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन, (जेमसेफ) सातारा संस्थेच्या श्री.छ.प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र, माने कॉलनी सातारा या शैक्षणिक संकुलात नववर्षाचे औचित्य साधून, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेला माता-पिता पाद्यपूजन व संकल्प सोहळा पारंपारिक पद्धतीने उत्साहात संपन्न झाला.