श्री आनंद नटराज व शिवकामसुंदरी या देवतांच्या कृपेने आणि श्री कांची कामकोटी पिठाचे महास्वामी, परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती स्वामी ,तसेच परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व परमपूज्य विद्यमान पीठाधीपती, श्री शंकर विजयेन्द्र सरस्वती स्वामी, यांचे पूर्णानुग्रह आणि शुभाशीर्वादाने सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील सर्व देवतांचा वार्षिक रथोत्सव सोहळा नटराज मंदिरात बुधवारी सायंकाळी पाच वाजता ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राच्या जयघोषात ध्वजारोहण व प्रधान संकल्प होऊन प्रारंभ झाला.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडी कायम आहे. बुधवारी सातारा शहरात १४.९, तर महाबळेश्वरला १२.९ किमान तापमानाची नोंद झाली.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या दुष्परिणामांची दाहकता पोहोचवण्यासाठी हरित सातारा तर्फे प्लास्टिक पिशव्या निर्मूलन उपक्रम शुभारंभ अनंत इंग्लिश स्कूलमध्ये झाला.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती करून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये सर्वसामान्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिनी मंत्रालय उभे केले.
सर्वांत जास्त अनुदानित महाविद्यालये असणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंजाबराव देशमुख आदी महामानवांच्या दूरदृष्टी व शैक्षणिक चळवळीमुळे हे शक्य झाले आहे.
मला किती मिळेल याचा कधी हिशोब केला नाही. मी केलेल्या कामातून किती लोक माझ्या पाठीशी राहतील, किती मत देतील याचा कधी विचार केला नाही.
मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा 12 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत होणार आहे. यात्रा शांततेत, उत्साहात व सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करुन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात.
हिवाळ्यात भरपूर भाज्या बाजारात असतात. त्यात हिरवे मटार ही भाजी अनेकांची आवडती असते. त्यामुळे ओले मटार बाजारातून घरी आवर्जून आणले जातात.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात निघालेल्या मोर्चा दरम्यान केली.
पर्यावरणाच्या दृष्टीने अति संवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात नाकिंदा हद्दीमधील हनीवूड हॉटेल शेजारील सर्वे नं 22/ब/6 या चेरी रैना कौल यांच्या जागेमध्ये अनेक वृक्षांची तोड करण्यात आली आहे.