सातारा शहरा नजीकच्या क्षेत्र माहुली येथे जमिनीच्या वादातून रिव्हाॅल्व्हर मधून हवेत फायरिंग झाल्याने परिसर हादरून गेला. फायरिंग झाल्यानंतर याठिकाणी तुंबळ हाणामारी झाली.
आपल्या राज्याच्या विकासामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका नेहमीच महत्वाची असते. या विभागामार्फत विविध प्रकारचे रस्ते, शासकीय, निमशासकीय इमारती बांधकाम व महत्वाची विकासकामे करून जनतेला सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
येथील उंटाच्या डोंगर परिसरात जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी गेलेल्या पथकावर बिबट्याने जोरदार हल्ला केला.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने प्रगतीचा आलेख कायम चढता ठेवून आदर्शवत कामकाज सुरु ठेवले आहे.
अलीकडील काळात सततच्या व्यस्त जीवनशैलीमुळे, वाढलेल्या ताणतणावांमुळे, मोबाईल-सोशल मीडियामुळे किंवा जीवनविषयक समस्यांची संख्या वाढल्याने राग येण्याचे आणि सतत राग येणार्या व्यक्तींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योगाच्या माध्यमातून सुरु असलेल्या प्रतापगड सहकारी कारखान्याच्या सण २०२४- २५ या चालू गळीत हंगामामध्ये १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत गाळप झालेल्या ऊसाचे प्रती मेट्रीक टन रु. ३ हजार प्रमाणे होणारे ऊस बील संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आल्याची माहिती अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांनी दिली.
सासवड, ता. फलटण येथील शंभूराज संतोष राऊत या अकरा वर्षीय मुलावर फलटणचे डॉक्टर युवराज कोकरे यांनी चुकीचे पायाचे ऑपरेशन केल्याने त्याला अपंगत्व आले आहे, असा आरोप त्याचे वडील संतोष राऊत यांनी पत्रकार परिषदेत करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
सातारा जिल्ह्यातील जनतेच्या मनाचे लाडके राजे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आहेत. त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातार्याच्या जनभावनेचा सन्मान करावा.
छत्रपती शाहू स्टेडियम मधील क्रीडा संकुलामध्ये अनेक क्रीडा प्रकारासाठी संकुले उपलब्ध आहेत. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही किक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारासाठी हॉल मिळत नसल्याची तक्रार राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक सागर जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
सध्या लोकांचा कल बाजारातील महागड्या स्किन केअर उत्पादनांपासून घरगुती उपायांकडे झुकलेला आहे. नैसर्गिक पद्धतींना प्राधान्य देत, आजींनी सांगितलेले पारंपरिक उपाय पुन्हा लोकप्रिय होत आहेत.