सातारा शहर परिसरात अवैध पद्धतीने फटाक्यांचा साठा केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये पंचांसमक्ष 90 हजार रुपये किंमतीचे अवैध फटाके व दारू जप्त करण्यात आली आहे.
रचनात्मक समाज हा मानवी कल्याणासाठी नेहमीच प्रेरक असतो. या रचनात्मक समाजासाठी त्यांना मार्गदर्शन करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक ठरतात. भाजपच्या गटनेत्या व आचार्य सिद्धी पवार हे असेच व्यक्तिमत्त्व आहे. विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणार्या सिद्धी ताई यांनी अल्पावधीत केलेले कार्य प्रेरणादायी आहे, असे उद्गार अभिनेते स्वप्निल जोशी यांनी काढले.
वाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघात माझ्याच घरात सर्व सत्ता घेवून विद्यमान आमदारांनी लोकशाहीची थट्टा चालवली आहे. मीच आमदार, माझाच भाऊ खासदार, जिल्हा बँकेचा चेअरमन देखील आमच्याकडेच..,मीच दोन्ही साखर कारखान्याचा चेअरमन, आम्हीच बाजार समितीचे संचालक, आम्हीच सरपंच...
सातारा जिल्ह्यामध्ये खाजगी फायनान्स कंपनीचा कारभार बेफाम झाला असून यावर कोणताही शासकीय प्रतिबंध नाही. हा मनमानी कारभार तातडीने थांबवावा अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे. याचे निवेदन त्यांनी शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना सादर केले.
लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये कमालीचा श्रेयवाद सुरू आहे. राज्याची वित्तीय तूट दोन लाख तीस हजार कोटी इतकी प्रचंड आहे, तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष करून राज्य शासन धडाधड वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहे. राज्यात महिला अत्याचार वाढलेले असताना लाडक्या बहिणींच्या योजनेचे कौतुक केले जात आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, अशी घनाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.
तडीपारीचे आदेश असतानाही दोन वेगवेगळ्या घटनेत दोघेजण पोलिसांना फिरत असल्याचे दिसल्याने त्यांना पकडून त्यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जुन्या भांडणाच्या कारणातून हातोड्याने मारहाण केल्याप्रकरणी आलोक वायदंडे याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एमआयडीसी परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
साखरेमुळे वजन वाढणं, लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. जर साखरेचं अधिक प्रमाणात सेवन केलं तर तुम्हाला तब्येतीच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Fitness Tips) अनेकजण वजन कमी करण्यासाठी साखर पूर्णपणे सोडण्याचा विचार करतात पण काहीही केल्या त्यांची साखर सुटत नाही. साखरेचं सेवन कमी केल्यानंतर शरीरात काही बदल दिसून येतात. कोणते बदल दिसतात ते पाहूया.
माची पेठ परिसरातील चिकन दुकानांमध्ये भीषण स्फोट होऊन मुजमिल हमीद पालकर या इसमाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाचा सातारा शहर पोलीस कसून तपास करत असून गुरुवारी या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे.