दुर्गा पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
एकावर कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी तिघां विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महायुतीचे आमदार असलेले मकरंद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लोणंद शहराच्या विकासासाठी आणलेल्या 56 लाख रुपये विकास कामासाठी खोडा घालण्याचा प्रयत्न चालविला होता. श्रेयवादासाठी शिवसैनिकांना व शासकीय यंत्रणेवर दबाव टाकणार्या आमच्याच महायुतीच्या आमदारा विरोधात आता आम्ही सर्व शिवसैनिक व मित्र पक्ष त्यांना पराभूत करण्यासाठी मैदानात उतरलो आहोत. यापुढील काळात आमदाराच्या बगलबच्चांनी आमच्या नादी लागू नये.
ऐतिहासिक शाहू नगरीने शनिवारी विजयादशमीचा अर्थात दसर्याचा शाही बाज अनुभवला. हत्ती, घोडे, उंट, पारंपारिक वेशातील मावळे अशा शिवकालीन स्वरूपात सातार्यातून दसर्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे आठ लाखांचे मोबाईल हस्तगत करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.
सातारा शहर पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून दोघांवर कारवाई केली आहे.
अत्याचारासह साडेतेरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त वीरांगना प्रतिष्ठान च्या वतीने होम मिनिस्टरचा कार्यक्रम बसवेश्वर भवन या हॉल वर संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत खेळात सहभाग घेतला. भरघोष बक्षिसे जिंकून पैठणी व लेडीज सायकल मिळाल्याने महिलांचा आनंद द्विगुणीत झाला.
अनेक अडथळ्यांवर मात करुन आणि पाणीदार आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याने टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती मिळाली आहे. या योजनेसाठी एकूण आठ टीएमसी पाणी आणि 7 हजार 370 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या योजनेचा माण आणि खटावला सर्वाधिक लाभ होणार आहे. सुजलाम, सुफलाम माण - खटाव स्वप्नपूर्तीच्या दिशेने निघाला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह व्हिडिओद्वारे केले.
गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजने(जिहे कटापूर योजना) करीता सन 2022-23 च्या दरसुचीनुसार रुपये 5409.72 कोटी रुपयांच्या तिस-यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत देण्यात आली. या निर्णयामुळे खटाव, माण, कोरेगांव आणि सातारा तालुक्यातील एकूण 176 गावांमधील 60,437 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. या तीसऱ्या सुधारित प्रशासकीय मंजूरीमुळे कायम दुष्काळी भाग म्हणून माण,खटाव तालुक्याला लागलेला कलंक निश्चितपणे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.