किरोली तालुका कोरेगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हा मार्ग 33 येथील रेल्वे मार्गावर नाली क्रमांक 339 ही तीन मीटर रुंद व तीन मीटर उंच आहे. या नालीची उंची तात्काळ वाढवण्यात यावी. कारण ग्रामस्थांना वाहतुकीला अडथळा येत आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासन यांनी तातडीने कार्यवाही करावी अन्यथा तारगाव स्टेशन येथे रेल्वे रोको करण्यात येईल, असा इशारा किरोली ग्रामस्थांनी दिला आहे.
खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दिव्यांग महिला लतिका जगताप यांचे घराचे राहते शेड खेड ग्रामपंचायत च्या वतीने विरोध करूनही पाडण्यात आले. या कारवाईचे प्रत्यक्ष कारण समजू शकले नाही मात्र या घटनेच्या निषेधार्थ दिव्यांग बांधवांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. सातारा शहर पोलिसांनी या आंदोलनात तातडीने हस्तक्षेप केला.
सातारा शहरातील फळभाजी व्यापारी सामाजिक कार्यकर्ते व संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी निराधारांच्या पुनर्वसनाचा संकल्प सोडला असून या कामासाठी समाजातून मोठा निधी उभा राहावा यासाठी ते प्रयत्नरत आहेत.
सातारा शहरात पडलेल्या खड्ड्यांमध्ये मंगळवारी चक्क गोट्यांचा डाव रंगला. दलित पँथर सातारा यांच्यावतीने शहरातील ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा निषेध या अभिनव आंदोलनाद्वारे करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सातारा नगरपालिका या दोन्ही आस्थापनांचा निषेध करण्यात आला. खड्ड्यात गोट्या खेळून करण्यात आलेल्या आंदोलनाची आज सातारा शहरात जोरदार चर्चा होती.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
येत्या विधानसभा निवडणुकीत रयत क्रांती संघटनेचा कोणताही वापर आम्ही होऊ देणार नाही. यंदा कोणत्याही परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा आम्ही स्वबळावर लढविणार, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात दारुबंदी असतानाही येथे दारु विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातल्या त्यात कुडाळ मधील ‘वारा’ प्यायलेल्या ‘गडे’ ने तर आपल्या अवैध साम्राज्यामुळे जावलीतील रणरागिनींनी केलेल्या ऐतिहासिक लढ्याला हरताळ फासण्याचे काम केले आहे. मात्र, या मद्यसम्राट वारागडे बाबत तेथील स्थानिक पोलीस प्रशासन मूग गिळून का गप्प आहेत, हे न सुटणारे कोडे आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यात पोलिस यश आले असून पोलिसांनी संशयितांकडून सुमारे २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, संशयित सर्वजण सातारा शहर व सातारा तालुक्यातील आहेत.
सातारा पालिकेकडून पाणी योजनेचे अत्याधुनिकीकरण (अॅटोमेशन) केले जात असताना आता विद्युत विभागाकडूनही शहरातील पथदिव्यांना तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे कोणता दिवा बंद, कोणता सुरू हे एका क्लिकवर समजणार असून, दिव्यांची तातडीने दुरुस्तीही करता येणार आहे.
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.