नवरात्र उत्सवानिमित्त वीरांगना प्रतिष्ठान च्या वतीने होम मिनिस्टरचा कार्यक्रम बसवेश्वर भवन या हॉल वर संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत खेळात सहभाग घेतला. भरघोष बक्षिसे जिंकून पैठणी व लेडीज सायकल मिळाल्याने महिलांचा आनंद द्विगुणीत झाला.
अनेक अडथळ्यांवर मात करुन आणि पाणीदार आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याने टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती मिळाली आहे. या योजनेसाठी एकूण आठ टीएमसी पाणी आणि 7 हजार 370 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या योजनेचा माण आणि खटावला सर्वाधिक लाभ होणार आहे. सुजलाम, सुफलाम माण - खटाव स्वप्नपूर्तीच्या दिशेने निघाला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह व्हिडिओद्वारे केले.
गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजने(जिहे कटापूर योजना) करीता सन 2022-23 च्या दरसुचीनुसार रुपये 5409.72 कोटी रुपयांच्या तिस-यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत देण्यात आली. या निर्णयामुळे खटाव, माण, कोरेगांव आणि सातारा तालुक्यातील एकूण 176 गावांमधील 60,437 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. या तीसऱ्या सुधारित प्रशासकीय मंजूरीमुळे कायम दुष्काळी भाग म्हणून माण,खटाव तालुक्याला लागलेला कलंक निश्चितपणे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.
सातारा-जावली मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा करून सातत्याने कोट्यवधींच्या निधीची बरसात करणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन सातारा व जावली तालुक्यातील ३२ विकासकामे मार्गी लावण्यासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा, गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून हा निधी मंजूर केला आहे.
गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेसाठी महायुती सरकारने 2022-23 च्या दरसूचीनुसार 5409.72 कोटी रुपयांच्या निवेदला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. नियामक मंडळाने या उपसा सिंचन योजनेचे कार्यक्षेत्र वाढवल्याने सातारा, कोरेगाव, माण, खटाव या चार तालुक्यातील 176 गावांचे 6004.37 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. ही योजना येत्या दीड वर्षात पूर्ण करावयाची आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात कधी-कधी बाहेर जाणे आणि फिरणे कठीण होऊन बसते. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही घराबाहेर न पडताही 10 हजार पावलं चालून सहज पूर्ण करू शकता? फक्त काही स्मार्ट पद्धतींचा अवलंब करा आणि घरात राहूनही तंदुरुस्त आणि सक्रिय रहा.
किल्ले सज्जनगड-ठोसेघर मार्गावर बोरणे घाटात कचर्यांचे ढिगारे दिसून येत आहेत. कोणी अज्ञाताने हा कचर्याचा ढीग टाकल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या कचर्यामुळे परिसरातील वन्य जीवांना धोका असून पर्यटकांसह निसर्ग प्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने दुचाकी घसरून राजू तानाजी कोरे (वय 43, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रहिमतपूर हद्दीतील चौकीचा आंबा येथे दि. 8 रोजी सायंकाळी सहा वाजता झाला. या अपघातात राजू कोरे यांची पत्नीसुद्धा गंभीर जखमी झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. सध्या दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जात आहे.
युवकांचे राष्ट्र म्हणून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. त्यामुळे देशाच्या लोकशाहीला युवकच बलशाली करू शकतात. आत्मनिर्भर आणि वैभवशाली राष्ट्रासाठी युवकांनी 100 टक्के मतदान करावे, असे आवाहन माजी खासदार पूनम महाजन यांनी केले.