विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा शहरात ऐन गणेशोत्सवाची धामधूम आणि गणेश भक्तांची गर्दी असताना येथील मोती चौकामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने टप्प्याटप्प्याने 18 जणांचा चावा घेतला. यामुळे शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
उमेदीच्या काळात कसून केलेला व्यायाम आणि त्याला चौरस आहाराची दिलेली जोड यामुळे आजही वयाच्या 100 या वर्षांमध्ये मी तंदुरुस्त आहे. या शताब्दी वर्षांमध्ये अनेक स्वप्न पूर्ण झाली, काही स्वप्न बाकी आहेत.
मौजे शृंगारपूर येथील सर्वे नंबर 142/12 या जागेवर महाराणी येसूबाई यांचे स्फूर्ती स्थळाचा विस्तार करून त्याला स्मारकाचा दर्जा देण्यात यावा. जिल्हा प्रशासन पातळीवर हा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न तातडीने सोडवला जावा याकरिता येसूबाई फाउंडेशनच्या वतीने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला एक महिन्याची मुदत देण्यात येत आहे.
सातारा : गुरुवार दि. 12 सप्टेंबर रोजी कै. भाऊसाहेब हनुमंतराव कादबाने उर्फ भाऊ यांचा दशक्रिया विधी खळद, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील कऱ्हा नदीच्या काठी सकाळी 8.
गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये सर्व वाद्य वाजवण्यास शासनाने रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. बहुतांशी मंडळांनी आरास केलेली आहे. ते पाहण्यासाठी आजुबाजुच्या गावातील लोक येत असतात. रात्री १२ नंतर वाद्य वाजवण्यास बंदी केल्यामुळे आरास पाहण्यास दर्शक थांबत नाहीत.
स्वारगेट वरून पुणे-बेंगलोर महामार्गावरून सांगलीकडे निघालेल्या शिवशाही बसला वाढेफाटा परिसरात टायर फुटून अचानक आग लागली. यामुळे महामार्गावर एकच गोंधळ उडाला. दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडल्याचे वृत्त आहे. सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसवे गावाच्या हद्दीत महामार्गाच्या पुलाखाली एका इसमावर कारवाई करून त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्टल, तीन जिवंत काडतुसे व दोन मोटरसायकल असा दोन लाख 25 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये बाकीचे संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ही कारवाई केली.
हिंदू धर्मियांच्या आराध्य दैवताबाबत वादग्रस्त आक्षेपार्ह आणि अपमान जनक वक्तव्य केल्याबद्दल ज्ञानेश महाराव याला ताबडतोब अटक अटक करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे आज पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे करण्यात आली.
कोरेगावचे विद्यमान आमदार यांच्या राजकीय दबावापुढे लोटांगण घालून तेथील पोलीस त्यांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे काम करत आहेत. माझ्या कार्यकर्त्यांना अमिषे दाखवली जात आहेत, वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत, विरोधकांची कुंडली काढून खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत, असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे आमदार राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.