सर्वधर्मीय सण आणि उत्सवांना अधिकाधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून गेली अकरा वर्षे चालणाऱ्या ‘कुर्बानीचे रूप नवे’ या अभियानांतर्गत अंनिस आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सातारा येथे बकरी ईदनिमित्त रक्तदानाने ‘कुर्बानी’चे नवे रूप समाजासमोर मांडले.
शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्यामुळे साहित्य संमेलनाचा मान साताऱ्याला मिळाला आहे. हे संमेलन सर्व ताकतीने यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी माझ्याकडून सहकार्य राहील.
३१ मे रोजी बुढानिलकंठा महानगर पालिका, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे जावळी तालुक्यातील अंधारी गावचे सुपुत्र अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी, आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर धनाजी शेलार यांनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत अनेक मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हरवून सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.
माणूस आपले हक्काचं चांगलं घर निर्माण करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न करतो. आपण फारतर 100 वर्षांपर्यंत जगतो. शेवटी स्मशानभूमीतच यावे लागते. आपण जेथे जाणार ते ठिकाण चांगले असावे.
घाटरस्त्यांचे महत्त्व केवळ भौगोलिक द़ृष्टीनेच नव्हे, तर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय द़ृष्टिकोनातूनही अत्यंत मोलाचे आहे.
पुणे- बेंगलोर महामार्गावर नागठाणे ता. सातारा गावाच्या हद्दीत टेम्पो व दुचाकीच्या भीषण अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाला. इब्राहिम हसन शेख वय ३८ व मेहक इब्राहिम शेख वय १२ वर्ष रा. जऊळके खु. रेटवडी हडपसर पुणे हे ठार झाले.
साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, ही सातारकरांची इच्छा होती. ती आज पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये पूर्ण झाली आहे.
पोक्सो प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 32 वर्षांनंतर सातारमध्ये भरणार आहे. आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागांतर्गत सातारा जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त अनूसुचित जाती/ नवबौध्द मुलांकरीता शासकीय निवासी शाळा,म्हसवड ता.माण जि.सातारा येथे शासकीय शाळा कार्यान्वीत आहे.