सातारा जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज पाटण तालुक्यातील पाटण, हेळवाक येथील पूर परिस्थितीचे व नवजा कडे खचलेला रस्ता यांची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
एव्हरेस्ट बेस कॅम्प, आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर किलीमांजारो... आता युरोप खंडातील सर्वात उंच शिखर माऊंट एलब्रुस सर करणाऱ्या साताऱ्याची 'अजिंक्यकन्या' धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिचे गुरुवारी (दि. २१) सायंकाळी सात वाजता साताऱ्यातील पोवई नाका येथील शिवतीर्थावर जंगी स्वागत केले जाणार आहेत.
जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर तालुका आपत्ती व्यवस्थ्ज्ञापन कक्ष कार्यरत ठेवा. येणाऱ्या प्रत्येक कॉलला सकारात्मक प्रतिसाद द्या. तसेच कॉलच्या नोंदी ठेवा, ज्या पुलांवर पाणी येते ते पूल वाहतूकीसाठी तातडीने बंद करा.
जिल्ह्यात सन 2025-2026 साठी पीककर्ज वितरणाचे 3800 कोटींचे उद्दिष्ट असून जुलै अखेर 2 लाख 49 हजार 186 खातेधारकांना खरिपासाठी 1812 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले.
येथील मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन आणि प्रभुणे क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुप्रसिध्द मनोविकार तज्ज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी यांचा प्रभावी पालकत्व या विषयावर संवाद आयोजित करण्यात आला आहे.
कोयना धरणासह धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी,तारळी व वीर या प्रमुख धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन अतिवृष्टीमुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात अॅग्रीस्टॅक योजना दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये खातेदार असणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यावर त्यांना फार्मर आयडी (शेतकरी नोंदणी क्रमांक) मिळणार आहे.
चिखली, ता. सातारा येथे आज शाळेत निघालेल्या लहानग्यांच्या अंगावर झाड कोसळल्याने चार शालेय मुले जखमी झाली आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’वरून निवडणूक आयोगाला घेरले आहे. काँग्रेसच्या वतीने देशभरात ‘वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ हू’ या उपक्रम सुरू केला आहे.