वाई पोलीस उपविभागाचे उपअधीक्षक बाळासाहेब भालचीम यांना प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले आहे, तसेच जिल्ह्यातील दोन पोलिसांना पोलिस महासंचालक विशेष सेवा पदक मिळाले आहे.
जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे नुतनीकरण करुन त्या ठिकाणी पालकमंत्री कार्यालय सुरु करण्यात आले आहे.
राजधानी साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशनच्या वतीने हे संमेलन होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे.
सातारा जिल्हयात दिनांक 8 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गोकुळअष्टमी, दहिहंडी, गणेश मुर्ती आगमन, गणेश मुर्ती विसर्जन, गणेशोत्सव असे उत्सव साजरे होत आहेत.
रान भाज्या ह्या नैसर्गिक पद्धतीने येतात. रानभाज्या शरिरासाठी अत्यंत पोषक आहेत. त्यांचा रोजच्या आहारामध्ये समावेश करावा, असे आवाहन त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
वाई तालुक्यातील कवठे हे गाव क्रांतिकारी व पुरोगामी विचारसरणीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. गावातील शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तहसीलदार यांना कायदेशीर मोजणीद्वारे रस्ता नकाशावर नोंदवून देण्याचे निवेदन दिले होते.
राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांना राज्याचे पर्यटनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
एव्हरेट बेस कॅम्प... किलोमंजारो... माऊंट एलब्रुस... ही शिखरे म्हणजे गिर्यारोहकांसाठी आव्हानाच. ही तिन्हीही आव्हाने अवघ्या १३ वर्षीय मुलगी पार करते, तेव्हा हे आश्चर्यच वाटते.
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला न्यायालयाने जन्मठेपेसह सुमारे दीड लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदापासून ऑनलाइन केल्याने अनेकांचा गोंधळ उडाला आहे. ऑगस्ट महिन्याचा मध्य उजाडला तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता या प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक आले असून, गुरुवारी होणाऱ्या विशेष फेरीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोर्टलवर रिक्त जागा निश्चित होणार आहेत.