उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी होते, उष्माघाताचा धोका वाढतो आणि त्वचेच्या समस्या देखील उद्भवू शकतात.
रा.ना. गोडबोले (सार्व.) ट्रस्ट व सातारा जिल्हयातील नागरिकांतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा सातारा भूषण पुरस्कार हा खऱ्या अर्थाने त्रिवेणी संगमच म्हणावा.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा सनसनाटी आरोप करणार्या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना काल दि. 22 रोजी सातारा पोलिसांनी अटक केली होती.
कडेगाव तालुक्यातील वांगी येथील वाल्मीक नगर परिसरातील जुना सांगली - सातारा रस्त्यावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण धडकेत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पती-पत्नी जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
योगाचा रोजच्या आयुष्यात अवलंब केल्याने केवळ शारीरिक आरोग्य सुधारतेच असे नाही तर मानसिक संतुलन आणि अध्यात्मिक जागृकता निर्माण होण्यासही मदत होते.
सार्वजनिक आरोग्य विभाग, स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर व्हॅनद्वारे कर्करोग तपासणी व जनजागृती अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते कर्करोग मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.
कराड येथील सहापदरीकरण पुलाच्या सेगमेंटचे काम 15 मार्च रोजी सुरु होतो. यावेळी कामाप्रसंगी कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्त हानी झालेली नाही.
राज्य सरकार मधील मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा सनसनाटी आरोप करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक राजवाडा मार्फत कामधेनु दत्तक ग्राम योजने मधून मौजे जकातवाडी येथील महिला पशुपालकांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, या अभ्यास दौरांमध्ये महिला पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक माहिती मिळण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे भेट देण्यात आली.
महाराष्ट्र शासन कृषि विभागा मार्फत २१ ते २३ मार्च २०२५ कालवधीत अलंकार हॉल, पोलिस करमणुक केंद्र, सातारा येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करणेत आलेले आहे.