रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा वर्धापन दिन 3 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचे प्रमुख उपस्थिती आहे.
राजवाडा परिसरातील गोलबाग येथे पालिकेच्या बांधकाम विभागाने मोती चौकाकडून गोलबागेकडे जाणारा रस्ता बंद केला होता. यादोगोपाळ पेठ व भवानी पेठेतील सर्व व्यापारी आस्थापनांचे सांडपाणी व्यवस्थित जलवाहिनीच्या माध्यमातून यानंतर शुक्रवार पेठेतील ओढ्यात सोडण्यात येणार आहे.
राज्य शासनाने पाटण तालुक्यातील पर्यटन संवर्धनाच्या दृष्टीने 70 कोटी रुपयांच्या पाच नवीन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यात सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात या अभियानांतर्गत पाणंद रस्ते खुले करण्यावर प्राधान्याने भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, भारतीय जनता पार्टी तर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा सुशासन पंधरवड्याचे आयोजन करण्यात येत असते.
साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उत्सकुता बालगोपाळांपासून अबालवृध्दांना आहे. हे संमेलन आता १ ते ४ जानेवारी २०२५ रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उत्सुकता आणखी वाढली आहे.
रामनगर ता.सातारा येथे अपघात झाल्याप्रकरणी अक्षय महेंद्र डांगे (वय ३०, रा. नेले पो.किडगाव ता.सातारा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
सातार्यातील सिव्हील हॉस्पिटल येथे दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात हाणामारी करणार्यांविरुध्द पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. रोहन संजय इंगळे (वय २४), रोहित दिलीप फाळके (वय २३, दोघे रा.सातारा रोड पाडळी ता. कोरेगाव) या दोघांवर गुन्हा झाला आहे.
तासगाव ता.सातारा येथे येथे बेकायदा दारु व्रिकीप्रकरणी उमेश सदाशिव यादव (वय ४२, रा. सासपडे ता.सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.