सातारा तालुका पोलिसांनी दि. 22 रोजी दोन अड्ड्यांवर छापे टाकून दोघांवर कारवाई केली आहे.
चोरी प्रकरणी चार अज्ञात महिलांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे खाली सापडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. पीडित महिलांच्या तक्रारी दाखल करून घेण्याकरता महिला पोलीस अधिकार्यांच्या नियंत्रणात असलेल्या भरोसा सेल इमारतीचे कामकाज येत्या महिनाभरात पूर्ण होईल. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सातारा शहरांमध्ये विनापरवाना स्पीकर लावून आणि रॅली काढून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहरातील 21 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहरातील व्यापार्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यासाठी दमदाटी केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जावली येथिल धडाडीचे उद्योजक, जावली पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच लोकशाही वृत्तसंस्थेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांना पंचायत समिती जावली यांच्याकडून पंचायत समिती मार्फत राबवण्यात येणार्या योजनांच्या प्रभावी वार्तांकनासाठी सन्मानित करण्यात येणार आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे अर्ज छाननी नंतर राज्यसभेचे बिनविरोध खासदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नितीन काकांच्या खासदारकीची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. यामुळे नितीन पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची नवी इनिंग सुरू होणार आहे आणि त्यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला तिसरा खासदार मिळणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. मुंबई, पुणे, लातूर, अकोला, बदलापूर अशा विविध शहरांमध्ये लहान मुली व महिलांना अत्याचारांना तोंड द्यावे लागत आहे. या घटनांकडे राज्य शासनाने संवेदनशीलपणे लक्ष दिले पाहिजे. याकरता ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी सातारा यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यावर धरणे आंदोलन करण्यात आले.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात 5 वातानुकूलित ई-बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस येत्या आठवडाभरात सातारा - स्वारगेट मार्गावर धावणार आहेत.
विद्येची देवता आणि संपूर्ण भारत देशाचेच आराध्य दैवत असणार्या श्री गणरायाच्या आगमनाला दोन आठवडे शिल्लक आहेत. सातारा शहरातील कुंभारवाड्यामध्ये श्रीमूर्तींवरून अंतिम हात फिरवला जात असून, सातार्यात मंडप उभारणीसाठी गणेश मंडळांची तयारीची लगबग सुरू आहे. दुसरीकडे मोठ्या गणेश मंडळांनी अधिकाधिक उंच गणेश मूर्तींची पारंपारिक प्रथा कायम ठेवली आहे.