मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
पवनचक्कीमधील तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वास्तविक, डोळे निरोगी राहावेत आणि शेवटपर्यंत चांगले, कार्यक्षम राहावेत, यासाठी बालपणापासून पोषक आहार मिळणे आवश्यक असते. पूरक आणि पोषक आहारच इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांनाही कार्यक्षम आणि निरोगी राखू शकतो.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान दिले असून तें आचरणात आणण्याची आपली जबाबदारी असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज कराड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन अभिवादन केले.
अतिरागामुळे किंवा रक्तदाब वाढल्यामुळे मन अशांत राहते. या दोन्हीही स्थितीमध्ये आपली डावी नाकपुडी किंवा नासिका चालू असते. हे लक्षात घेता दररोज डावी नासिका एक तासापर्यंत बंद ठेवून उजव्या नाकपुडीने श्वासोच्छ्वास सुरू ठेवल्यामुळे म्हणजेच श्वास घेणे आणि सोडण्याची क्रिया केल्यामुळे रागावर नियंत्रण मिळवता येते, असे मुद्राशास्त्र सांगते. यासाठी योगसाधनेमध्ये शांत मुद्रा प्रभावी सांगितली गेली आहे.
सातार्यातील गोडोली येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी उघड केला. याप्रकरणात धाराशिव जिल्ह्यातून एकाला अटक करुन पोलिसांनी त्यांच्याकडून 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान, दुसर्या संशयिताचेही नाव समोर आल्यानंतर त्याला सातार्यातून अटक करण्यात आली.
सातारा जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासह त्यांच्या विविध समस्यांसाठी विधानसभेमध्ये निश्चित पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही, कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांनी दिली आहे.
गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी मधील मुलांच्या वस्तीगृहात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणामुळे विद्यार्थीही सुखावले.
मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दराचा प्रश्न गाजत असून राज्यातील महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर तरी सोयाबीनला दर मिळणार का याकडे बळीराजाचे लक्ष लागून राहिले आहे. महायुती सरकार वचनपूर्ती करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.