सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली.
जिल्ह्यातील कराडमध्ये गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज आज कराड न्यायालयाने फेटाळून लावला.
खेड ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अपहार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, ग्रामस्थ व काही माजी पदाधिकाऱ्यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.
कृष्णा व वेण्णा नदीचा संगम असलेले ठिकाण म्हणजे संगम माहुली दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.
भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज साताऱ्यात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
वाढत्या दिखाऊपणा, अवाजवी खर्च आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणार्या विवाह सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर तांबवे (ता. वाळवा) येथील सामाजिक कार्यकर्ते रतन पाटील यांनी आपल्या मुलाचा विवाह अत्यंत साधेपणाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ मध्ये सातारा जिल्ह्याने देशातील पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्रातही अव्वल स्थान मिळविले आहे.
सातारा जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महत्त्वाचा प्रशासकीय बदल करण्यात आला असून उपअधीक्षकपदाची जबाबदारी आता शैला शंकर कोरडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
सातारा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी समर्थ मंदिर ते बोगदा या मार्गावरील अतिक्रमण हटाव आणि रस्ता रुंदीकरण मोहिमेला नगरपालिका प्रशासनाने गती दिली आहे.