सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांनी सन्मानित!
बँकिंग फ्रंटिअर्स ही एक राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी मल्टी प्लॅट फॉर्म मीडिया कंपनी आहे. त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा पुरस्कार देवून गौरव केला जातो. तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये होत असलेले विविध तांत्रिक बदल व चालू घडामोडींचा आढावा घेवून बँकिंग फ्रंटिअर्स मासिकांचे माध्यमातून माहिती बँकांपर्यंत पोहोचविणेचे उल्लेखनिय कामकाज करते.
सातारा : बँकिंग फ्रंटिअर्स ही एक राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी मल्टी प्लॅट फॉर्म मीडिया कंपनी आहे. त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा पुरस्कार देवून गौरव केला जातो. तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये होत असलेले विविध तांत्रिक बदल व चालू घडामोडींचा आढावा घेवून बँकिंग फ्रंटिअर्स मासिकांचे माध्यमातून माहिती बँकांपर्यंत पोहोचविणेचे उल्लेखनिय कामकाज करते.
नुकतेच या संस्थेमार्फत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस देण्यात आलेले देशातील ‘‘सर्वोत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक’’ , ‘‘सर्वोत्कृष्ट मोबाईल बँकिंग ॲप’’, आणि ‘‘ सर्वोत्कृष्ट कर्ज पुरवठा वाढ’’ असे तीन पुरस्कार लखनौ, उत्तर प्रदेश येथे बँकिंग फ्रंटिअर्स कंपनीचे ज्यूरी श्री.प्रमोद कर्नाड आणि बँकिंग फ्रंटीअर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बाबू नायर, संपादक श्री.मनोज अग्रवाल व श्री.भरत सोलंकी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये बँकेच्या संचालिका सौ. कांचनताई साळुंखे, सौ.ऋतुजाताई पाटील, संचालक श्री.सुरेश सावंत, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, उपव्यवस्थापक श्री.गणेश नलावडे, अधिकारी श्री.राजेंद्र गायकवाड, श्री.शैलेश चव्हाण यांनी स्विकारला.
बँकेने ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अद्ययावत सुविधा देणेकरीता बँकेच्या सर्व शाखांवरील कोअर बँकिंग प्रणाली सुरू केलेली आहे. मोबाईल बँकिंग, किसान पे ॲप, भिम ॲप यु.पी.आय, इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस/एनईएफटी /क्लिअरिंग, QR कोड, ए.टी.एम, मायक्रो ए.टी.एम.पेमेंट प्रणाली सुविधांचा अवलंब करून राष्ट्रीयकृत बँकेच्या तोडीची सुविधा ग्राहकांना देवून क्रांती केली आहे . सदर सुविधांचा वापर बँकेचे ग्राहक करीत असून त्यामुळे ग्राहकांना २४*७ बँकिंग व्यवहार करता येत आहेत. तसेच या महत्वपूर्ण व उल्लेखनीय कार्याची नोंद घेवून बँकिंग फ्रटिंअर्स या देशपातळीवरील मोठया आकाराचा जिल्हा बँक श्रेणीतील ‘‘सर्वोत्कृष्ट बँकिंग ॲप’’ करीताचा पुरस्कार बँकेस प्रदान करणेत आला आहे.
बँकेने RBI/NABARD च्या मार्गदर्शक तत्वानुसार व मा.संचालक मंडळाच्या मान्यतेने कर्जपुरवठा धोरणे तयार केली असून बँकेमार्फत धोरणानुसार कर्जपुरवठा करणेत येत आहे. बँकेने वि.का.स.सेवा संस्थामार्फत तिच्या सभासदांना, बँकेच्या सभासद संस्था, कंपन्यांना, ग्राहकांना वेळेमध्ये व आवश्यक तेवढा कर्जपुरवठा उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे जिल्हयामध्ये नवीन उद्योजक निर्माण होण्यास मदत झाली आहे. बँकेने शासनामार्फत राबविणेत येणा-या आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार निर्मीती कार्यक्रम इ. योजनांतर्गत जिल्हयातील शेतकरी व उद्योजकांना मोठया प्रमाणात कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला असून याकरीता बँकेस शासन स्तरावरील विवीध पुरस्काराने सन्मानित केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत बँकेचा कर्जपुरवठा रक्कम रू. ५४३०००.०० लाखांवरून रक्कम ७२९३००.०० लाख एवढा झाला असून बँकेने कर्ज पुरवठयामध्ये अंदाजे ३५ % एवढी वाढ साध्य केली आहे. याचीच दखल घेवून बँकिंग फ्रंटीअर्स या कंपनीने बँकेस सर्वोत्कृष्ट कर्जपुरवठा वाढ (Best Credit Initiative) पुरस्कार देवून बँकेस सन्मानित केले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवर यांनी सातारा जिल्हा बँकेचा, देशामध्ये गौरवशाली परंपरा असलेली व बँकिंग क्षेत्रामधील आदर्श बँक म्हणून बँकेचा विशेष उल्लेख केला श्री .मनोज अग्रवाल व श्री.भरत सोळंकी यांनीही बँकेच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामकाजाची प्रशंसा केली. तसेच श्री. बाबू नायर म्हणाले, सातारा जिल्हा बँक सर्वसामान्य ग्राहकांना बँकिंग सेवा व सुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्यात याकरीता बँक ३०७ शाखा व १२ विस्तारित कक्ष, ६७ ए.टी. एम, ६५० मायक्रो ए.टी.एम.आणि ए.टी.एम.मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून जिल्हयाच्या कृषी व ग्रामीण विकासासाठी निरंतर कार्य करीत आहे.
पुरस्कार मिळणे हा बँकेवरील ग्राहकांचा दृढ विश्वासासाठी आवश्यक असून बँकेस एकूण ११० हून अधिक पुरस्कार मिळविणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एकमेव बँक ठरेल असा विश्वास बँकेचे अध्यक्ष खा.श्री. नितीन पाटील यांनी व्यक्त केला.
मा.श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय- धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हयातील सर्वसामान्य शेतक-यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. या तीन पुरस्कारांमुळे बँकेच्या नावलौकिकामध्ये आणखी भर पडली आहे. जिल्हयातील सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबवित असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ट निधी नियोजन, शून्य टक्के निव्वळ एन.पी.ए. दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगव्दारे ग्राहकाभिमूख सेवा यामुळे आय.एस.ओ.९००१:२०१५ मानांकन मिळालेले आहे.बँकेस आजपर्यंत महाराष्ट्र शासन, नाबार्ड, नॅफस्कॉब, राज्य बँक, महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक असोसिएशन तसेच देशातील इतर सहकारी संस्थांकडून विविध १०० हून अधिक पुरस्काराने बँकेस गौरविणेत आले आहे.
Lending-New Roots New Fruits या विषयावर बँकिंग फ्रंटीअर्स या संस्थेने या कार्यक्रमात व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. यासाठी सातारा जिल्हा बँकेच्या वतीन मा.श्री. डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी या चर्चेत सहभाग घेवून सहकारी बँकेचा कर्जपुरवठा व या अनुषंगाने येणा-या विविध अडचणी याबाबत विचार व्यक्त केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका हया ग्रामीण भागात कार्यरत आहेत. बँकांना कर्ज पुरवठा अनुषंगाने भारतीय रिझव्र्ह बँक तसेच नाबार्ड यांचेकडून बँकांना वेळोवेळी सहकार्य केले जात असलेचे व यापूढेही अधिकचे सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या पुरस्काराबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक मा.श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, खा.श्रीमंत छ.उदयनराजे भोसले, संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री ना.श्री. शामराव उर्फ बाळासाहेब पाटील, आ.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ.श्री.मकरंद पाटील, बँकेचे उपाध्यक्ष श्री.अनिल देसाई तसेच सर्व संचालक सदस्य यांनी अभिनंदन करून बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.