शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती साठी असहकार आंदोलन सुरू करावे : राजू शेळके
ऊस दराच्या लढ्या नंतर शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण ताकतीने मैदानात उतरली आहे.
सातारा : ऊस दराच्या लढ्या नंतर शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण ताकतीने मैदानात उतरली आहे. पण ज्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवायचा आहे त्यांनी घरी बसून चालणार नाही असे स्पष्ट मत स्वाभिमानी चे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे .
सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचे मोठे जाळे आहे परंतु त्याचा वापर शेतकऱ्यांचे फायदा कमी व शोषण जास्त असाच अनुभव आजपर्यंत आहे वारंवार होणारे निसर्गातील बदला मुळे शेती पिकांची प्रचंड हानी झाली आहे नैसर्गिक आपत्ती बोगस खते व बियाणे यामध्ये वर्षोनुवर्षे शेतकरी भरडला जातोय हमीभावाची फक्त घोषणा होते शेतमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडून शेतकऱ्यांना लुटले जात आहे.सरकार आश्वासना पलिकडे जाऊन शेतकऱ्यांना कोणतीही मदत करत नाही तरीही शेतकऱ्यांनी योग्य संधी चा लाभ घेण्यासाठी लढण्याची गरज आहे त्यासाठी आजपासून असहकार आंदोलनाला शेतकऱ्यांनी सुरुवात करायची आहे यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी झाले पाहिजे यासाठी कोणतेही कर्ज भरायचेच नाही. जोपर्यंत सरकारने सत्तेवर येण्या अगोदर दिलेले आश्वासन पाळत नाही आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती ची घोषणा करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवायचे आहे. आम्हाला आज भुक लागली आणि पंच पक्वान्न देणार असे नुसते सांगुन चालेल का एक वर्षे झाले तरी सरकार अजून आश्वासन पाळत नाही व पाळेल असे वाटत नाही व आंदोलन केले की वेगवेगळ्या नियम अटी शर्ती लाऊन कर्जमुक्ती पासून जास्ती जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालाच नाही पाहिजे यासाठी मुदती घेऊन चाणाक्ष पणाने फसवत आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी सुध्दा हुशार व सावधान होऊन कोणतेही कर्ज भरायचेच नाही कारण यांनी सात बारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन परत फक्त शेती कर्ज माफ करतो किंवा शेतकरी आंदोलन करत असेल जाब विचारत असेल तर त्याला अपशब्द वापरले ते आपण सर्वांनी पाहीले आहेत व ३१ जून ही तारीख कर्जमुक्ती साठी निश्चित केली आहे परंतु आज ऊस बिलातून वसूली करायची कर्जमुक्ती साठी नियमित कर्जफेड केली म्हणून अपात्र करायचे असे षडयंत्र सरकारचे चालू आहे हे स्पष्ट दिसत आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कर्जच भरायचे नाही व कोणत्याही परिस्थितीत ऊस बिल किंवा अजून कोणत्याही मार्गाने वसूल करुन द्यायचे नाही त्यासाठी जो साखर कारखाना ऊस बिलातून कर्जाची कपात करणार नाही अश्याच साखर कारखाना यांना ऊस घालावे तसेच विकास सेवा सोसायटी यांनी बेकायदेशीर वसूली ऊसबिलातून करु नये अन्यथा स्वाभिमानी यांना सुध्दा हिसका त्यांना दाखवला जाईल हे लक्षात ठेवावे कारण आपण शेतकऱ्यांच्या अज्ञान पणाचा गैरफायदा घेत आला आहे व शंभर टक्के वसुली दाखवून फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकांची एजंटगीरी करुन वर्ष पूर्ण होण्या अगोदरच बेकायदेशीर वसूली करत आला आहात त्यासाठी जर असा प्रकार केला तर जशास तसे उत्तर त्यांना दिले जाईल तसेच शेतकऱ्यांचे ऊस बिल ज्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत सेव्हिंग खात्यात जमा केले जाते त्याचा गोपीनीयतेचा भंग आजपर्यंत बॅकेने केला व जबरदस्ती ने शेतकऱ्यांचे खात्यातील येणारे पैसे कपात करुन सोसायटी यांना वर्ग केले आहेत आता जर शेतकऱ्यांचे खात्यातील पैसे कपात केले तर बॅकेंचा परवाना रद्द करण्यासाठी नक्कीच आंदोलन करायला भाग पाडू नये शेतकरी गेली अनेक वर्षे सर्व कर्ज नवे जूने करुन कर्जबाजारी झाला आहे आणि बॅकेंच्या बेकायदेशीर वसूली मुळेच या अगोदरही कर्जमुक्ती पासून वंचित राहिला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येईल कोणी बेकायदेशीर वसूली करेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आमच्याशी संपर्क करावा परंतु कर्जमुक्त झाल्याशिवाय आता माघार नाही.
राजू शेळके
जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा