आठही आमदार महायुतीचे असणार - धैर्यशील कदम
सातारा जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येणाऱ्या आठही विधानसभेच्या उमेदवारांना विधानसभेत पाठवण्याचे काम महायुतीतील सर्व घटक आणि कार्यकर्ते करणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सातारा : सातारा जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येणाऱ्या आठही विधानसभेच्या उमेदवारांना विधानसभेत पाठवण्याचे काम महायुतीतील सर्व घटक आणि कार्यकर्ते करणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी बोलताना धैर्यशील कदम म्हणाले केंद्र सरकारच्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना जनसामान्यांच्या परत पोहोचवण्याचे काम माहितीतील सर्व घटक आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत त्यांच्या कार्यामुळे महाविकास आघाडी मार्फत राज्यात निगेटिव्ह वातावरण तयार झालेले असताना सुद्धा सातारा जिल्ह्याचा खासदार म्हणून उदयनराजेंना निवडून दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माहितीचा पत्रकार परिषदेला महायुतीचे लोकसभा समन्वयक सुनीलतात्या काटकर, विधानसभा समन्वयक अविनाश कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद शिंदे, आरपीआय (आ) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सोनू साबळे, युवराज कांबळे, शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्यासह महायुतीचे सर्व घटकातील पदाधिकारी उपस्थित होते.