नागठाणे गटात आ. मनोजदादांना दुप्पट मते
कराड उत्तर विधानसभा मतदार संघात सर्व धुरीणांचे अंदाज फोल ठरवत आ. मनोजदादा घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांच्या गेल्या 25 वर्षीच्या सत्तेला धक्का देत मोठा विजय मिळवला. सातारा तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या असणार्या नागठाणे जिल्हा परिषद गटावर यावेळी सबकुछ मनोजदादा घोरपडे अशी हवा उमेदवारी जाहीर झाल्यापासून होती.
नागठाणे : कराड उत्तर विधानसभा मतदार संघात सर्व धुरीणांचे अंदाज फोल ठरवत आ. मनोजदादा घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांच्या गेल्या 25 वर्षीच्या सत्तेला धक्का देत मोठा विजय मिळवला. सातारा तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या असणार्या नागठाणे जिल्हा परिषद गटावर यावेळी सबकुछ मनोजदादा घोरपडे अशी हवा उमेदवारी जाहीर झाल्यापासून होती. त्यामुळेच नागठाणे जिल्हा परिषद गटात नागठाणे व अतीत या दोन्ही गणातून मनोज घोरपडे यांना 16,423 व बाळासाहेब पाटील यांना 7,883 मते मिळाली. घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांच्यावर तब्बल 8,540 चे मताधिक्य घेतल्याने त्यांचा विजय सुकर झाला.
भैरवगड पासून काशीळपर्यंत पसरलेल्या या गटात नागठाणे, अतीत, काशिळ, पाडळी, निनाम, मांडवे, सासपडे, सोनापूर या मोठ्या गावातून तसेच भैरवगड, गणेशवाडी, समर्थगाव, खोडद, निवडूंगवाडी आशा अनेक छोट्या गावातून मनोज घोरपडे यांना भरभरून मतदान झाले. या गटातील सर्वच गावात घोरपडे यांनी आघाडी घेतली. खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम याचे मोठे पाठबळ मनोजदादा घोरपडे यांना मिळाले. खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांनी मनोजदादा यांच्या प्रचाराची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतल्याने मनोजदादा घोरपडे यांना भरभरून मते मिळाली.
माजी जि. प.सदस्य समृद्धी जाधव,बाळासाहेब साळुंखे गुरुजी, पं.स.सदस्य विजया गुरव,भाजप महिला मोर्चा अध्यक्षा अंजली जाधव,माजी पं.स.सदस्य राजेंद्र ढाणे, विश्रांती साळुंखे,डॉ अजित जाधव,अधिकराव साळुंखे, बाळासाहेब लोहार, अजित साळुंखे, प्रशांत गाढवे, आशिष पवार, गणेश साळुंखे, तुषार साळुंखे, नितीन साळुंखे, माजी सरपंच विष्णू साळुंखे पाटील, श्रीरंग गोरे,दीपक नलवडे,नंदकुमार नलवडे, शिवाजी डांगे, दिलीप मोरे, स्वाती ढाणे, नकुसा चव्हाण, अभिजीत साळुंखे, गणेश जाधव, इंद्रजित ताटे यांचे परिश्रम मनोजदादांच्या कामी आले. सलगच्या दोन पराभवाने खचून न जाता गेल्या दहा वर्षांपासून नागठाणे गटात प्रत्येक गावातील सर्व तळागाळातील लोकांशी असणारा दांडगा जनसंपर्क तसेच महायुतीच्या माध्यमातून अनेक गावांत केलेली विकासकामे याच्या जोरावर मनोज घोरपडे यांनी गटात सुरुवातीपासूनच मोर्चेबांधणी करून प्रचारात आघाडी घेतली होती.
तसेच दोन्ही राजे गटाची ताकत युवा कार्यकर्त्यांची फळी, सर्व हिंदुत्ववादी संघटना, यापूर्वी गटात कराड उत्तर स्वाभिमानी सखी मंचच्या माध्यमातून अनेक ठिकाणी घेतलेले महिला मेळावे, भाजप सरकारच्या माध्यमातून मिळालेले लाडकी बहीण योजना त्यामुळे महिलांचा मोठा पाठींबा, नागठाणे येथे दोन्ही राजेंच्या नेतृत्वाखाली झालेली विराट सभा. यामुळे मनोज घोरपडे यांचे या गटात जोरदार वातावरण तयार झाले होते. या उलट बाळासाहेब पाटील यांनी गेल्या काही वर्षात केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहचवण्यात ते यशस्वी झाले नाहीत. तसेच सातारा तालुक्यातील स्थानिक उमेदवार असल्याचा फायदाही मनोजदादा घोरपडे यांना झाला.